4 December 2016

॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६

संतांचे सांगणे अगदी नेमके आणि मार्मिक असते. नेहमीच्या, माहितीच्या शब्दांचेही चपखल अर्थ सांगावेत ते संतांनीच. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेला 'एकांत' शब्दाचा अचूक अर्थ देखील असाच बहारीचा आहे.
प. पू. श्री. मामासाहेब म्हणतात, " एक म्हणजे मन. त्या मनाचा अंत म्हणजे एकांत. मनाचे जे अनेक विकल्प आहेत, ते कमी होणे हाच खरा एकांत. "
समजा लोक नसलेल्या जागी आपण एकटेच बसलेलो आहोत; पण मनात शेकडो विचार चालू आहेत. कसली ना कसली चिंता चालूच आहे. कसं होईल? काय होईल? हे थांबलेले नाही. मग तो एकांत कसा म्हणता येईल?
मनाचे काही ना काही संकल्प विकल्प चालूच असतात. त्या मनाचे ते चंचलत्व हळूहळू कमी होणे, साधनेने ते मन शांत होत जाणे, हाच खरा एकांत आहे. आणि त्यासाठीच सतत आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेचा ध्यास घेतला पाहिजे, हेच प.पू.श्री.मामांच्या आजच्या अमृतबोधाचे मर्म आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates