1 January 2017

॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥

श्रीभगवंतांपासून निर्माण झालेला मूळ ज्ञानाचा प्रवाह म्हणजे वेद होत. या चार वेदांचे स्पष्टीकरण करण्यासाठी ऋषिमुनींनी सहा शास्त्रे निर्माण केली. आणि या वेदशास्त्रांतील मर्म वेदव्यासांनी अठरा पुराणांच्या माध्यमातून सहज सोप्या भाषेत लोकांसमोर ठेवले. म्हणून या सर्व ग्रंथांमधून एका विश्वव्यापक भगवान श्रीहरींचेच वेगवेगळ्या शब्दांत गुणवर्णन केलेले आढळते. एवढे सगळे नुसते वाचायलाही एक जन्म पुरणार नाही, मग त्यांचा अभ्यास करणे दूरच राहिले. अशा परिस्थितीत आपण सर्वसामान्य पण काहीतरी परमार्थ करण्याची प्रामाणिक इच्छा असणा-या, श्रद्धाळू लोकांनी करायचे तरी काय? या आपल्या मनातील तळमळीचा नेमका विचार करून भगवान श्री माउली हरिपाठाच्या दुस-या अभंगातून आपल्याला उत्तम उपदेश करतात.
या अभंगातील महत्त्वाचा  अनुकरणीय भाग सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ही सर्व विश्वव्यापी श्रीहरींचेच वर्णन करीत असली, तरी दह्यातून ज्याप्रमाणे लोणी काढून घेतात, त्याप्रमाणे या सर्व ग्रंथांतून हरिभक्तीचेच सार निवडून घेतले पाहिजे. "
सर्वसामान्यांना कठीण तत्त्वज्ञान किंवा कठोर व्रते, यज्ञयाग यांच्या माध्यमातून उपासना करणे शक्य नाही; म्हणूनच त्यांनी सहजसोप्या हरिभक्तीचीच कास धरावी, असे सर्व संतांचे सांगणे आहे. हाच विचार सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या दुस-या अभंगातून सविस्तर मांडतात, त्याचे पू.मामांनी केलेले अप्रतिम विवरण आपण यथाक्रम पाहूया !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates