22 January 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥

निर्गुण परब्रह्माचे श्रुती म्हणजेच वेदोपनिषदे वर्णन करतात, 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।' प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या वचनाचा अर्थ फार मार्मिक सांगतात की, "सर्व त्रिगुण वस्तूंत व्यापून असूनही, जे स्वत: आपल्या निर्गुण स्वरूपाचा त्याग करीत नाही; तेच सत्य व नित्य होय !" विश्वरूपाने नटूनही त्याचवेळी ते परब्रह्म निर्गुणरूप देखील असतेच. याचे सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात फार सुंदर विवेचन केलेले आहे.
माउली म्हणतात, अक्षरे जशी लिहिली किंवा पुसली तरी त्यांचा अर्थ जसा कायमच राहतो; लाटा उत्पन्न झाल्या किंवा मोडल्या तरी पाणी जसे कायमच असते; त्याप्रमाणे अविनाशी परब्रह्म सर्व भूतांच्या अस्तित्वात अखंडपणे असते. सोन्याचे वेगवेगळे दागिने केले व नंतर ते पुन्हा आटवले. या दोन्ही प्रसंगी सोने कायमच असते, ते काही तिथून जात नाही की नष्ट होत नाही; तसेच पुन्हा पुन्हा जन्मणा-या व नाश पावणा-या या जगतात, त्या जगाचा आधार असणारे निर्गुण परब्रह्म अमरत्वाने कायमच राहते. जग निर्माण झाले काय किंवा नष्ट झाले काय; परब्रह्म जसेच्या तसेच असते. या दोन्ही स्थितीत त्याचे निर्गुणत्व भंगत नाही. म्हणूनच माउली त्या सर्वश्रेष्ठ परब्रह्मालाच केवळ 'सार' म्हणतात !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates