12 January 2017

॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥

भगवान श्री माउलींचे शब्द हे बहुआयामी असतात. त्यांचा विचार अक्षरश: अनंत दिशांनी करता येतो, करावा लागतो. या किमयेत श्री माउलींच्याच कृपेने पू.मामासाहेब देशपांडे महाराज अतिशय तयार होते. आता या 'व्यर्थ कथा' शब्दाचेच  उदाहरण घ्या. पू.मामा या अवघ्या दोन शब्दांचे किती प्रकारांनी अर्थ करतात पाहा.
एक प्रापंचिक मनुष्य आहे. त्याचा सगळा दिवस कुटुंबासाठी लागणारे द्रव्य संपादन करण्यात जातो. म्हणजे त्याचा प्रत्येक दिवस हा व्यर्थच जाणार. तर काहींचा टिंगल-टवाळी करण्यात वाया जातो.
एक व्यापारी आहे, 'पैसा मारो परमेश्वर' म्हणणारा. तो अधूनमधून सत्संगालाही जातो; पण संतांचा बोध आचरणात न आणता, पैशालाच परमेश्वर मानतो. म्हणजे त्याचे संतांजवळ जाणे, प्रवचन ऐकणे हे सर्व व्यर्थच नाही का?
एक भक्त आहे. तो मनात येईल त्या देवास जातो, मनात येईल ते नाम घेतो; पण एके ठायी स्थिर होण्यासाठी श्रीगुरूंचे मार्गदर्शन मात्र घेत नाही. समजा एखाद्याला भाग्याने श्रीगुरुकृपा प्राप्त झाली; तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो साधना करीत नाही. मग त्याचेही ते वागणे व्यर्थच नाही का?
म्हणजे या सर्वांना आपापल्या ठिकाणी 'व्यर्थ कथा'च म्हणायला हवे. अशा या सर्व प्रकारांचा व मार्गांचा त्याग करून, असल्या कोणत्याच व्यर्थ कथांमध्ये न गुंतता, श्रीगुरूंनी दिलेली साधना, नामजप प्रेमाने व नेमाने करण्यातच खरे हित असून, तोच श्रीहरींच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग आहे; असे श्री माउली या अभंगातून परोपरीने आपल्याला समजावून सांगत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates