30 January 2017

॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥

सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या तिस-या अभंगातील सगुण-निर्गुण विचाराचा समारोप, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अत्यंत सुंदर व महत्त्वपूर्ण शब्दांमध्ये करतात. ही सर्व वाक्ये नेहमी चिंतनात ठेवावीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण  आहेत.
पू.मामा सांगतात, "एकदम निर्गुणाचा अनुभव येणे अशक्य असल्यामुळे, सगुण आणि निर्गुण एकच आहे अशी शुद्ध भावना ठेवूनच त्याप्रमाणे भक्ताने वर्तन करावे. परमात्म्यापासून उत्पन्न होणा-या सगुण रूपासच 'भगवती शक्ती' असे म्हणतात व तिच्या आधारानेच जीवाला मुक्ती मिळते; म्हणून तिलाच 'भक्ती' असेही म्हणतात.
प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती(टेंब्ये) स्वामी महाराजांनीही याविषयी सुंदर सांगितले आहे. ते म्हणतात, "सगुणाची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे; कारण त्याशिवाय निर्गुणाची अनुभूती येणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा व कायद्याचा अभिमान असतो, तसा देवाला आपल्या सगुण रूपाचा व वेदशास्त्रांचा अभिमान असतो. शिक्कामोर्तब किंवा कायदा म्हणजे राजा नाही हे खरे; पण त्याशिवाय त्याचा व्यवहार होत नाही; हेही तितकेच खरे !"
म्हणून सगुण-निर्गुणाच्या नुसत्या चर्चेपेक्षा, सगुणाची भक्ती करून त्यातून प्रकट होणा-या निर्गुणाची प्रचिती घेण्यातच आपले खरे हित आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates