21 January 2017

॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली म्हणतात की, त्रिगुण व त्यांचाच विस्तार असणारे जग असार आहे व निर्गुण तेवढे सार आहे. त्यातील त्रिगुणांचे प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले विवरण आपण पाहिले. आता त्यांनी केलेला निर्गुणाचा विचार पाहूया.
निर्गुण म्हणजे गुणरहित. गुणरहित म्हणजेच सत्त्व, रज व तम हे तीन गुण ज्यात नाहीत ते. त्या निर्गुण परमात्म्याव्यतिरिक्त या जगात काहीही अस्तित्वातच नाही. माउली सांगतात की हे परमतत्त्व गुण व इंद्रियांहून वेगळे आहे. त्याचा गुणांशी कसलाही संबंध देखील नाही; पण हे असार गुण त्याच सारभूत तत्त्वाच्या, चैतन्यमय परब्रह्माच्या अधिष्ठानावर अाभासित होतात.
श्रीभगवंतांची मायाच त्रिगुणरूप होऊन हा प्रचंड प्रपंच निर्माण करते. त्रिगुणात्मक असल्यामुळे तो केवळ भ्रमाने भासतो. म्हणूनच माउली त्याला असार म्हणतात. तो सतत बदलणारा व कधी ना कधी नष्ट होणारा आहे. पण निर्गुण परब्रह्म जसेच्या तसेच राहणारे, कधीही न बदलणारे, विकाररहित व अविनाशी आहे.
माउलींचे हे सर्व सांगणे नेमकेपणाने उद्धृत करताना पू.मामा म्हणतात, "नीट विचार करून पाहिले असता, केवळ भ्रांतीमुळे भासमान होणारा हा प्रपंच अनित्य आहे आणि ज्या चैतन्यसत्तेवर तो भासतो, ते निर्गुण परब्रह्म नित्य किंवा शाश्वत आहे."
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates