11 January 2017

॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री, पू.पार्वतीदेवी देशपांडे म्हणत असत की, " एक पक्षी आहे, त्याला दोन पंख आहेत; एक पंख कापला तर तो उडू शकेल का? नाही. तसेच जीवरूपी पक्ष्याला चिदाकाशात उडण्यासाठी 'योगरहस्य' व 'बोधरहस्य' असे दोन पंख आहेत! "
ज्ञान तर हवेच, पण त्याचबरोबर साधनाही व्हायला हवी, तरच पूर्ण अनुभूती येते. म्हणूनच श्री माउली, साधकांनी व्यर्थ कथांमध्ये चुकूनही रमू नये, असे आवर्जून बजावतात.
'व्यर्थ कथा' या संदर्भाने श्रीज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातल्या एका विशेष ओवीचा पू.मामा येथे उल्लेख करतात. श्री माउली म्हणतात की,  मोराच्या पिसा-यातील प्रत्येक पिसावर डोळा असतो. पण जर त्याचे खरे डोळे जाऊन त्याला अंधत्व आले; तर त्या इतर डोळ्यांचा ज्याप्रमाणे काहीही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून बाकी सर्व शास्त्रज्ञान व्यर्थ आहे. यासाठीच परमार्थात स्वानुभवाला जेवढे महत्त्व दिलेले आहे, तेवढे इतर कशालाच नाही. पण दुर्दैवाने लोक नुसत्या वरवरच्या गप्पांमध्येच जास्त रमतात, परंतु अतिशय महत्त्वाच्या असलेल्या साधनेचा मात्र कंटाळा करतात. या सर्वसामान्यांच्या सवयीचा विचार करूनच माउली सांगतात की, साधकांनी व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतूच नये, तो बहिर्मुख मार्ग पुरता सोडून द्यावा व आपली साधनाच प्राणपणाने करावी; तरच श्रीअनंतांचा लाभ होईल !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates