24 January 2017

॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥

हरिपाठ हा जरी सार विचार असला, तरी तो पूर्वपुण्याईच्या जोरावर भेटलेल्या श्रीगुरूंच्या कृपेनेच केवळ प्राप्त होत असतो. जोवर ती कृपा होत नाही, तोवर आपण विचारांतून सुटून त्याचे आचरण करूच शकत नाही. हे आपले सोडवणे श्रीगुरूंनाच करावे लागते, तेच श्रीहरींकडे जाण्याचा मार्ग आपल्याला प्रदान करीत असतात, असे प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात.
सुरुवातीला जरी ते शब्दज्ञान एका मर्यादेपर्यंत अावश्यक असले, तरी त्याचा पुढे उपयोग नसतो. जे ज्ञान शब्दांनी झालेले आहे, त्याचा साधनेने अनुभव घ्यावा लागतो. पू.मामांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी यावर सुंदर कथा सांगत असत. एकदा एका सिंहाला गोळी लागून तो मेला. फिरता फिरता एका ग्रामसिंहाला म्हणजे कुत्र्याला ते शव दिसले. त्याने संधीचा फायदा घ्यायचे ठरवून, पोटाकडून त्याचा सर्व भाग मोकळा केला व तो त्या कातडीच्या आवरणात शिरून बसला. तो कुत्रा मग सिंहाच्या ऐटीत गावात आला. त्याच्या इतर भाऊबंधांनी 'या वनराज' म्हणून त्याचा जयजयकार केला. तेवढ्यात एक उन्मत्त हत्ती ची ची करीत तेथे आला. त्याबरोबर हा सिंहाचे कातडे पांघरलेला ग्रामसिंह दोन पायात शेपूट घालून पळून गेला. त्याचा आपण सिंह असल्याचा उसना आणलेला आव एका क्षणात नष्ट झाला.
पोकळ शब्दज्ञानाचेही असेच होते. ते नुसते शब्दज्ञान हे अनुभूतीशिवाय टिकूच शकत नाही. परमार्थात अनुभूतीशिवाय असणारे इतर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणूनच, हरिपाठाचा खरा अर्थही साधनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाने समजल्याशिवाय व्यर्थ आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates