10 January 2017

॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या दुस-या अभंगातून मंथनाची गूढ  प्रक्रिया सांगतात. पण त्यासोबत काय करू नये? हेही सांगतात की, 'वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥'
प.पू.श्री.मामा नेहमी म्हणत की, " माउलींच्या शब्दांचे अर्थ त्यांच्याच वाङ्मयाच्या आधारे लावावेत." माउलींच्या वाङ्मयाच्या सखोल अभ्यासासाठी पुरेपूर संदर्भही त्यांच्याच वाङ्मयात मिळतात व तेच सर्वात उत्तम ठरतात.
सद्गुरु श्री माउलींच्या या चरणावर पू.मामा दोन प्रश्न उपस्थित करतात; आता कथा कोणत्या? त्यांतील व्यर्थ व वाया कोणत्या? या प्रश्नांचे समर्पक उत्तर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात सांगून ठेवलेले आहे, अशी पुष्टीही लगेच जोडतात.
मोठा गाढा विद्वान आहे, कोणते शास्त्र त्याला माहीत नाही असे नाही. पण अध्यात्माचा विषय आला की, पाल अंगावर पडल्यासारखा तो त्वरित झटकून टाकतो. परमार्थाची थट्टा करतो. योगशास्त्राचे त्याचे वावडेच अाहे. उपनिषदांचे नाव काढले की तो पाठमोरा होतो. असल्या पांडित्याचा काय उपयोग? हे असले निव्वळ शब्दज्ञान विषयलोभी मनाला शुद्ध करू शकत नाही; तिथे श्रीगुरुकृपेने होणारी प्रेमयुक्त साधनाच उपयोगी पडते ! परमात्म्याच्या प्रेमभक्तीवीण इतर सर्व गोष्टी या व्यर्थ, वायाच आहेत. नुसते पांडित्य किंवा शब्दज्ञान उपयोगाचे नाही; त्याप्रमाणे अनुभूती पण असावी लागते. म्हणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी साधकांसाठी 'योगरहस्य' व 'बोधरहस्य' अशी दोन प्रकरणे रचलेली आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates