20 January 2017

॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज पुण्यतिथी !! ॥ हरिपाठ मंजिरी - ३५ ॥

सद्गुरु श्री माउलींप्रमाणेच श्रीसंत एकनाथ महाराजही त्रिगुणांचे उत्तम विवरण करतात. पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी नाथभागवतातील ते त्रिगुण विवेचन, विशेष असल्याने मुद्दामच येथे घेतलेले आहे.
नाथ महाराज म्हणतात की, मोजता येणार नाही इतके आयुष्य असणारे ब्रह्मदेव जिथे त्रिगुणांची विभागणी करू शकत नाहीत, तेथे इतरांच्या सामर्थ्याबद्दल काय बोलणार? हे तिन्ही गुण; शुद्ध असोत किंवा मिश्रित असोत, ते प्रत्येक जीवाला गुणकर्मांनी बांधतातच. घड्यातील पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते. ते पाहून सूर्य त्या घड्यात अडकल्या सारखेच वाटते. हा जसा भास असूनही खरा वाटतो, तसेच हे गुणही आत्म्याला बंधनात पाडतात.
गुणांशी एकरूपता झाली की, आपण त्या बंधनात अडकलो आहोत, असा जीवाला भास होतो. गुण म्हणजे दोरा. अर्धवट उजेड व अर्धवट अंधारात पडलेल्या दोरीवर सापाचा भ्रम होऊन आपण घाबरतो. तसेच हे त्रिगुणही भासमान बंधनात पाडून जीवाला भरपूर कष्ट सहन करायला लावतात.
(आज प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांचे व पू.मामांचे छायाचित्र सोबत दिलेले आहे.)
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates