18 January 2017

॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥

त्रिगुण बंधन कसे निर्माण करतात, याचे विवरण सद्गुरु श्री माउली करीत आहेत. त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. तो आत्मा पांचभौतिक देहात आला की, त्याच्या मूळच्या व्यापक परमात्मस्वरूपाचा संकोच होऊन तो जीवदशेला येतो. त्याक्षणी त्याच्या ठिकाणी 'हा देहच मी' ही भावना प्रथम निर्माण होते. त्या जन्म-मरण असणा-या देहाचे सर्व धर्म तो निरवयव आत्मा फुकटच आपल्यावर घेतो व स्वत:हूनच बंधनात पडतो. वाढ होणे, कमी होणे, नाश पावणे, तहान-भूक, सुख-दु:ख इत्यादी सर्व त्या देहाचेच विकार आहेत, आत्मा तर यांच्याहून पूर्ण वेगळा आहे. पण तो आनंदमय आत्मा त्या देहाच्या संगतीने हे सर्व स्वत:चेच धर्म मानून त्यांचा सतत अनुभव घेऊ लागतो. एकदा का हा देहाशी तादात्म्य पावला की, मग तिन्ही गुण आपापल्या परीने त्याला आणखी बद्ध करतात. ज्याप्रमाणे माशाने आमिष गिळले की हिसडा देऊन कोळी तो गळ ओढू लागतो, तसेच हे सत्त्व, रज व तमरूपी पारधी जीवात्म्याला आपल्या पाशांनी बांधून हैराण करतात. म्हणूनच श्री माउली त्यांना 'असार' म्हणतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates