Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 December 2016

॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य-पावन हरिपाठाच्या  प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेल्या विवरणाचे  आपण चिंतन करीत आहोत. गेले पंधरा दिवस पाहात असलेल्या पहिल्या अभंगाचा सारांश आजच्या अमृतबोधातून जाणून घेऊया. श्री माउलींनी त्यांच्या सर्व वाङ्मयाचे सार म्हणून 'हरिपाठ' या...
Read More

30 December 2016

॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥

भगवान श्री माउली हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या चरणात, 'व्यासांचिये खुणे' असा उल्लेख करतात. सामान्यपणे त्याचा नेमका संदर्भ लावता येत नाही. पण पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्याचा फार सुंदर अर्थ सांगत असत. पू.मामांनी त्यांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवींना याबद्दल विचारले. त्या...
Read More

29 December 2016

॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥

भगवान श्री माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगावरील प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे रहस्योद्घाटक असे अप्रतिम विवरण आपण पाहात आहोत. इंद्रियदेवता प्राणांच्या घरी जाण्याची प्रक्रिया पू.मामा सविस्तर सांगत आहेत. कळसूत्री बाहुलीला काळ्या दो-याचे एक टोक बांधून दुसरे टोक कळसूत्री चालक आपल्या हातात...
Read More

28 December 2016

॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥

नऊ द्वारांच्या शरीररूपी द्वारिकेतील इंद्रियदेवता म्हणजेच त्या द्वारिकेचे राणे होत. हे राणे 'पांडवां घरी' येतात म्हणजे काय? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा सुरेख खुलासा करतात. ते म्हणतात की, 'द्वारिकेचे राणे'चा खुलासा झाल्यावर मी आमच्या आईला, "मग पांडव म्हणजे काय?" विचारले. ती म्हणाली, " पांडव...
Read More

27 December 2016

॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥

श्री माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचे प्रचलित शेवटचे चरण, "ज्ञानदेव म्हणे व्यासांचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरी ॥" असे आहे. पण यातली महत्त्वाची चूक पू.मामा दाखवून देतात. काव्याच्या नियमाप्रमाणे, शेवटच्या कडव्यात प्रथम 'ज्ञानदेव म्हणे' असे आल्यावर, पुढे 'णे'च दोनदा आला पाहिजे. या उचित नियमानुसार...
Read More

26 December 2016

॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥

काल आपण चार देहांच्या चार वाणींमधून झालेल्या नामजपाचा सखोल विचार केला. त्याच संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात, ते आता पाहू. सद्गुरु श्री माउलींनी ' हरि मुखें म्हणा.. ' मधून वैखरीने होणारा नामजप सांगितलेला नाही. ते सांगतात तो जप कोणत्या मुखाने करायचा अाहे?...
Read More

25 December 2016

॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली 'हरि मुखें म्हणा... ।' असा उपदेश करतात. माउली खरेतर अवघी एकच ओळ इथे सांगतात, पण त्यामागे आभाळाएवढा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. तो जाणायला त्यांची कृपाच हवी. त्यांची अपरंपार कृपा असल्यामुळेच, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज माउलींचे हृद्गत नेमकेपणे व्यक्त करीत असत. हरिपाठावरील...
Read More

24 December 2016

॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥

पुण्यात्मक वासना व पापात्मक वासना समूळ गेल्याशिवाय मुक्तिलाभ होत नाही. पण या वासना जाणार कशा? याचे उत्तर श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या तिस-या चरणात देतात. " असोनि संसारी, जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्र उभारी, बाह्या सदा ॥३॥ " वेदशास्त्रे देखील हात वर करून सांगतात की, जिव्हेने सतत,...
Read More

23 December 2016

॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥

पाप आणि पुण्याच्या विविध प्रमाणांतील मिश्रणानुसार जीवाला जन्म लाभतात. पाप व पुण्याच्या वासनांच्या सारख्या प्रमाणातील मिश्रणाने मनुष्य जन्म मिळतो. नुसत्या पुण्यात्मक वासनांमुळे देवलोकात जन्म होतो, तर पापात्मक वासनांनी कृमीकीटकांच्या पापयोनीत जन्म होतो. मनुष्य जन्माचा सर्वात मोठा फायदा हाच की, या एकाच...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates