
सद्गुरु श्री माउली एका अभंगात म्हणतात की, *"हरिवांचूनि न दिसे रितें रे ॥"* सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या अभ्यासाने सर्वत्र श्रीहरींचीच प्रचिती येते. हा अनुभव आला की निर्गुणाशिवाय काहीही नाही, हे समजून येते.
म्हणूनच ते हरिपाठाच्या तिस-या अभंगाच्या तिस-या चरणात म्हणतात,
*अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार...