Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 January 2017

॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥

सद्गुरु श्री माउली एका अभंगात म्हणतात की, *"हरिवांचूनि न दिसे रितें रे ॥"* सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या अभ्यासाने सर्वत्र श्रीहरींचीच प्रचिती येते. हा अनुभव आला की निर्गुणाशिवाय काहीही नाही, हे समजून येते. म्हणूनच ते हरिपाठाच्या तिस-या अभंगाच्या तिस-या चरणात म्हणतात, *अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार...
Read More

30 January 2017

॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या तिस-या अभंगात पुढे म्हणतात, *'हरिवीण मन व्यर्थ जाय ॥'* त्यावर भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, हरिशिवाय मन कोठेही जाणार नाही. याचा अर्थच मनात येणा-या शुभाशुभ विचारांशी जोपर्यंत इंद्रियतादात्म्य नाही, तोपर्यंत भीती नाही. मन आपले संकल्प-विकल्पांचे...
Read More

॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥

सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या तिस-या अभंगातील सगुण-निर्गुण विचाराचा समारोप, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अत्यंत सुंदर व महत्त्वपूर्ण शब्दांमध्ये करतात. ही सर्व वाक्ये नेहमी चिंतनात ठेवावीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण  आहेत. पू.मामा सांगतात, "एकदम निर्गुणाचा अनुभव येणे अशक्य असल्यामुळे, सगुण...
Read More

28 January 2017

॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥

भक्तीने सगुणाची अनुभूती येते. पण ही भक्ती श्रीगुरुकृपेनेच उत्पन्न होत असते. तिलाच 'शक्ती' किंवा 'ज्ञान' असेही म्हणतात. "जे अनुभूती-ज्ञानात तल्लीन आहेत, ते यास 'ज्ञान' म्हणतात, शंकरभक्त यासच शक्ती म्हणतात. आम्ही यासच 'परमभक्ती' असे म्हणतो", असे श्री माउली सांगतात. ही भक्ती प्राप्त झाल्याशिवाय खरे भजन...
Read More

27 January 2017

॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥

सगुण व निर्गुणाचा श्रीसंत एकनाथ महाराज आपल्या भागवतात सुरेख समन्वय करतात. श्रीभगवंतांच्या तोंडी त्यांनी ओवी घातलेली आहे की, माझे निर्गुण निजस्वरूप किंवा वैकुंठातील शेषशायी सगुणरूप दोन्हीही एकरूपच होत."  देवांच्या ठायी सगुण-निर्गुण असा खरोखरी भेदच नाही. म्हणून माउली देखील सांगतात, विटेवर उभे...
Read More

26 January 2017

॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥

सगुण व निर्गुण या संज्ञांच्या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेल्या व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. पण समजायला कठीण आहेत, असे अनेकांनी काल कळवले. म्हणून आज त्यावर थोडा विचार करूया. हा विषय नीट समजावा म्हणून, प.पू.मामांनी व प.पू.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या वाङ्मयातून सांगितलेले संदर्भ उपयोगात...
Read More

25 January 2017

॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥

परमार्थामध्ये सद्गुरुकृपेने स्वत:ला आलेल्या अनुभूतीला सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. सर्व संत या एका गोष्टीचा कायम पुरस्कार करतात. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अनुभूतीचे श्रेष्ठत्व सांगताना, श्रीसंत तुकाराम महाराजांचे फारच मार्मिक प्रमाण देतात की, "कागदीं लिहितां नामाची साखर । चाटितां मधुर...
Read More

24 January 2017

॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥

हरिपाठ हा जरी सार विचार असला, तरी तो पूर्वपुण्याईच्या जोरावर भेटलेल्या श्रीगुरूंच्या कृपेनेच केवळ प्राप्त होत असतो. जोवर ती कृपा होत नाही, तोवर आपण विचारांतून सुटून त्याचे आचरण करूच शकत नाही. हे आपले सोडवणे श्रीगुरूंनाच करावे लागते, तेच श्रीहरींकडे जाण्याचा मार्ग आपल्याला प्रदान करीत असतात, असे प.पू.श्री....
Read More

23 January 2017

॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३८ ॥

सद्गुरु श्री माउली म्हणतात, त्रिगुण असार आहेत, निर्गुण तेवढे सार आहे; पण या सारासार-विचाराचे नुसता शब्दज्ञान होऊन भागते का? या वांझोट्या पोपटपंचीचा उपयोग काय, जर त्याचा अनुभवच घेतला नाही तर? म्हणून खरा सारासार-विचार हा प्रेमाने हरिपाठ करण्यातच आहे ! माउलींचे गर्भित सांगणे प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज...
Read More

22 January 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥

निर्गुण परब्रह्माचे श्रुती म्हणजेच वेदोपनिषदे वर्णन करतात, 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।' प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या वचनाचा अर्थ फार मार्मिक सांगतात की, "सर्व त्रिगुण वस्तूंत व्यापून असूनही, जे स्वत: आपल्या निर्गुण स्वरूपाचा त्याग करीत नाही; तेच सत्य व नित्य होय !" विश्वरूपाने नटूनही त्याचवेळी...
Read More

21 January 2017

॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली म्हणतात की, त्रिगुण व त्यांचाच विस्तार असणारे जग असार आहे व निर्गुण तेवढे सार आहे. त्यातील त्रिगुणांचे प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले विवरण आपण पाहिले. आता त्यांनी केलेला निर्गुणाचा विचार पाहूया. निर्गुण म्हणजे गुणरहित. गुणरहित म्हणजेच सत्त्व, रज व तम हे तीन गुण...
Read More

20 January 2017

॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज पुण्यतिथी !! ॥ हरिपाठ मंजिरी - ३५ ॥

सद्गुरु श्री माउलींप्रमाणेच श्रीसंत एकनाथ महाराजही त्रिगुणांचे उत्तम विवरण करतात. पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी नाथभागवतातील ते त्रिगुण विवेचन, विशेष असल्याने मुद्दामच येथे घेतलेले आहे. नाथ महाराज म्हणतात की, मोजता येणार नाही इतके आयुष्य असणारे ब्रह्मदेव जिथे त्रिगुणांची विभागणी करू शकत नाहीत, तेथे...
Read More

19 January 2017

॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥

सद्गुरु श्री माउली ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातही या त्रिगुणांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात. त्याचे विवरण प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी उत्तमप्रकारे केलेले आहे. श्रीभगवंतांची मायाशक्ती त्रिगुणात्मक आहे. तिचा विस्तार या तीन गुणांच्या साह्यानेच होतो. म्हणून तिच्याच स्वरूपाचा विस्तार असणारे...
Read More

18 January 2017

॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥

त्रिगुण बंधन कसे निर्माण करतात, याचे विवरण सद्गुरु श्री माउली करीत आहेत. त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. तो आत्मा पांचभौतिक देहात आला की, त्याच्या मूळच्या व्यापक परमात्मस्वरूपाचा संकोच होऊन तो जीवदशेला येतो. त्याक्षणी त्याच्या ठिकाणी...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates